Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मास्क न वापरणे पडले महागात : चौघाकडून दंड वसुल

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील खानापूर येथे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी कोरोनासंसर्ग संदर्भात जनजागृती केली. दरम्यान, तहसीलदारांनी तोंडाला मास्क न लावल्याने चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विलगीकरण कक्षाची नायब तहसीलदार संजय तायडे यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच अमिना तडवी, पत्रकार कुमार नरवाडे, ग्रा. प. सदस्य प्रकाश चौधरी, तलाठी भरत वानखेडे, ग्रामविकास अधिकारी विजय महाजन, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर कर्मचारी अशोक फेगडे, किरण सोनवणे, महेंद्र पाटील उपस्थित होते. नायब तहसीलदार संजय तायडे यांनी तोंडाला मास्क न बांधलेल्या चार जणांकडून प्रत्येकी ५००/ रू प्रमाणे दंड वसूल करण्यात केला.

Exit mobile version