Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश : अर्थमंत्री निर्मला सीतारामण

Nirmala Sitharam 1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वस्तू आणि सेवा करमुळे (जीएसटी) ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश आले असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केला आहे.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतांना म्हटले की, आम्ही अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे. कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आल्या आहेत. तसेच २७ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले आहेत. वस्तू आणि सेवा करमुळे (जीएसटी) ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आले आहे. अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना निर्मला सीतारामन यांनी जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असे सांगत जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आयुष्मान योजनेचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक योजनांमुळे ग्रामीण भागातल्या लोकांना लाभ झाला, असे निर्मला सीतारामण म्हणाल्यात.

Exit mobile version