Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.

 

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इतकी शांतता आपण ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे. लॉकडाउन आता आहे, नंतर आम्ही आहोतच, असे राज ठाकरेंनी खडसावून सांगितले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राज म्हणाले की, पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचे म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता, असे राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version