Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही, चिंता नसावी : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

 

काँग्रेसअंतर्गत वादामुळे मध्य प्रदेशात हे घडत आहे. मात्र, भाजपने त्याचे श्रेय घेवू नये, असे सांगत ज्योतिरादित्य सिंधिया यांना सांभाळायला हवे होते, तिथे काँग्रेस पक्षात मिस हँडलिंग झाले आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेनेही महाविकासआघाडी भक्कम आहे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे स्वप्न पाहू नये, असा टोला देखील त्यांनी लगावला. मध्यप्रदेशनंतर आता महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन कमळ राबवणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. ऑपरेशन कमळ वगैरे काही नसते. १०० दिवसांपूर्वी ऑपरेशन कमळ करून ८० तासांचे सरकार बनवले होते. परंतु ते कसे फेल गेले आणि ऑपरेशन करणारे कसे दगावले याचे भान स्वप्न पाहणाऱ्यांनी ठेवावे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात स्वप्न पाहू नये. अग्रलेख वाचत राहा, तो वाचण्यासाठी असतो चर्चेसाठी नसतो, असा जोरदार टोला राऊत यांनी लगावला.

Exit mobile version