Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मजुरांना राज्यात घ्यायला तयार नसलेल्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी बोलावे

मुंबई (वृत्तसंस्था) काही मुख्यमंत्र्यांनी मजुरांना राज्यात घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मजुरांना न स्वीकारणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ राज्यात परतत आहेत. पण काही मुख्यमंत्र्यांनी मजुरांना राज्यात घ्यायला तयार नाहीत. यावर शरद पवार यांनी ट्वीट करून माहिती दिली की, परप्रांतीय मजुरांच्या प्रश्नावर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या मजुरांच्या प्रवासासाठी एसटी बस उपलब्ध करून देऊ, असे सांगितले आहे. तसेच रेल्वे मंत्र्यांनीही या मजुरांच्या प्रवासासाठी रेल्वेची सोय करून देऊ, असे सांगितल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

Exit mobile version