Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्री असताना तुम्ही किती दौरे केलेत ? : शंभुराज देसाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आपण महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दौरे करत आहात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी किती दौरे केले होते, याकडे प्रथम त्यांनी लक्ष द्यावे असा सवाल शंभुराज देसाई   यांनी उपस्थित केला.

 

रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केवळ सरकारी बैठकांसाठी, कामासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जात असतील तर त्याच्यावर टीका करण्याचे कारण नाही, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले. आपण महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दौरे करत आहात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी किती दौरे केले होते, याकडे प्रथम त्यांनी लक्ष द्यावे.

 

मातोश्रीची दारं सामान्य माणसांसाठी उघडी झाली आहेत. यावर आम्हाला काही बोलायचं नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातून लोक मुंबईत येत आहेत. शिंदे साहेब राज्यभरात सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे सोयीस्कररित्या मुख्यमंत्र्यांवर टीका करु नका, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.

Exit mobile version