Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताचे प्रत्युत्तर : नियंत्रण रेषेवरील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त

श्रीनगर वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकला रात्री भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून यामुळे नियंत्रण रेषेवरील त्यांच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

काल रात्री जम्मू-काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाक रेंजर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यात नियंत्रण रेषेवरील पाकच्या अनेक चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. यात पाकची नेमकी किती हानी झाली याची माहिती समोर आली नाही. तथापि, लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, पाकने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवाना हुतात्मा झाल्याची माहिती सुध्दा या वृत्तात देण्यात आलेली आहे.

पाकने अलीकडे अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मिरच्या सीमावर्ती भागातील नागरी वस्त्यांना लक्ष केले आहे. यात बुधवारी पाकतर्फे जोरदार हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यास काल रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version