Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांचे संचारबंदीबाबत जनतेला आवाहन

भडगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी, संचारबंदी आदेश देण्यात आले होते तेच आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दि. १५ एप्रिल च्या मध्यरात्री पर्यत वाढविले आहेत.

जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सीमा बंदी लागू करण्यात आली होती. शासनाने १५ एप्रिलपर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (Lockdown) लागु करण्यात आली असल्याने तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्यात वाढ होऊ नये म्हणून दि. २३ मार्चला संचारबंदी केलेली होती. ती १५ एप्रिलच्या रात्री एक वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आज दि. २ एप्रिल रोजी भडगाव पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी संचारबंदी संदर्भात जनतेला आवाहन केले की दि.१५ एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी जमावबंदी लागु असल्याने कोणीही घराबाहेर पडु नये तसेच ग्रामीण भागातील पोलिस पाटील यांनी दंवडी देऊन कळवण्यात आले. अत्यावश्यक सेवा साठी कोणीही जास्त गर्दी करू नये. असे सांगितले

Exit mobile version