भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा कहर : वनक्षेत्र घटले, वन खाते निद्रीस्त !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात सध्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असून वन खात्याचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

 

जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे. खासगी तसेच राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते. काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुपी भ्रष्टाचारी यामुळे ही समस्या ओढवली आहे. गेल्या वर्षांत हजारो वृक्षांची अवैधरीत्या तोड झाली आहे. यात साग, निंब, आंबा, या वृक्षांची सर्वात  जास्त वृक्षाची तोड झाली; मात्र अनेक वर्षे जुने वृक्ष तोडले जात असल्याने तशी वृक्षराजी उभी करणे नजीकच्या काळात कठीण बनले आहे.

 

जिल्ह्यात व तालुक्यात अनेक  राखीव वनक्षेत्र आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग हा वनाच्छादित आहेत. जिल्ह्यातील एकूण भूभागाच्या जवळपास ५० टक्के भाग हा झाडे झुडुपांनी समृद्ध आहे. यात खासगी व राखीव वनक्षेत्रातील क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यात मालकी वनक्षेत्र असल्याने खाजगी वनक्षेत्रावर मोठी वृक्षतोड होते.

 

सॉ-मील, विट भट्टी, इंधन, फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करण्यात येते. जिल्ह्यातील एकूण भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर सागाचे वृक्ष आढळतात. डोंगरउतारावरील रचनेमुळे हिवाळ्याच्या उत्तरार्धात व उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. यामुळे आज जिल्ह्यातील बरीचसी जंगले उजाड होण्याच्या मार्गावर आहेत.

 

भडगाव तालुक्यातील कजगाव, कोळगाव, वलवडी, भडगाव शहर पारोळा रस्ता, एरंडोल रस्ता परिसरातील वनक्षेत्रात स्थानिक लोकांकडून स्वार्थासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे. दुसरे कारण म्हणजे वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्षसंपत्ती आज कमी होण्याच्या मार्गावर आहे. राखीव वनक्षेत्रात प्रामुख्याने अशा घटना कोणासही कानडोळा न लावता करण्यात येतात. यात संबधित परिसरातील काही वनपालापासून बड्या अधिकार्‍यांपर्यंत हात असण्याचा अंदाज असतो.जिल्ह्यात साग या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते; मात्र वनविभागाच्या चौक्यावर होणारी तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात. याचा अडथळा दुर करण्यासाठीही बर्‍याच वेळा लाकुड व्यावसायिकांकडून मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येऊन जिल्ह्यातील खाजगी तसेच राखीव वनक्षेत्रातील वृक्ष संपती तोड करुन परजिल्ह्यात व परराज्यात जात आहे.

 

जिल्ह्यात खासगी वनक्षेत्रात स्वार्थासाठी यंदाच्या वर्षात  यात साग, निंब, आंबा तब्बल अनेक वृक्षांची तोड झाली आहे. तर खैराची  झाडे , इतर वृक्षांची संख्या पाहता तब्बल हजारो डेरेदार वृक्षांची तोड केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वनाच्छादित क्षेत्र घटण्याचा धोका पर्यावरणाला निर्माण झाला आहे. तर राखीव वनक्षेत्रात वनपाल, वनमजुर यांची गस्ती असताना सुद्धा  बेकायदा वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.

Protected Content