Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रिक्षा उलटली : महिला जागीच ठार

 

रावेर, प्रतिनिधी । बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अपघाताचे सत्र थांबता-थांबेना आज पुन्हा विवरे नजिक रिक्षा पलटी होऊन अपघात झाला आहे. यात एक महिला जागीच ठार झाली असून काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दि १५ रोजी पपईने भरलेले आशयर पलटी होऊन १५ जणांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर पुन्हा दि. १६ रोजी  महामार्गाला लागुन असलल्या अजंदे नजिक खड्डा चुकवतांना एकाचा मृत्यु झाला होता. तर आज पुन्हा विवरे नजिक रिक्षा पलटी होऊन सगिराबी शेख सकुर (वय ४९) यांचा मृत्यु झाला असून काही प्रवासी जखमी आहे.

 

Exit mobile version