Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोपटासारखे भविष्य सांगितल्याने सरकार पडत नाही ; नवाब मलिक यांचा राणेंना टोला

मुंबई (वृत्तसंस्था) नारायण राणे हे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे ते पोपटासारखे भविष्य सांगत आहेत. मात्र अशा पोपटासारख्या चिठ्ठ्या काढून भविष्य सांगितल्याने सरकार पडत नाही. तो नंबर गेम असतो, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राणेंना लगावला आहे. दरम्यान, राणेंनी हे सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोसळणार असल्याचे म्हटले होते.

 

 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये एकमत नाही त्यामुळे हे सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोसळणार असल्याचे वक्तव्य भाजपा नेते नारायण राणे यांनी आज केले होते. दरम्यान, या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. नारायण राणे हे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे ते पोपटासारखे भविष्य सांगत आहेत. मात्र अशा पोपटासारख्या चिठ्ठ्या काढून भविष्य सांगितल्याने सरकार पडत नाही. तो नंबर गेम असतो, असा टोला मलिक यांनी लगावला. दरम्यान, महाविकास आघाडीत एकमत नाही, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हे सरकार राहील असे राणेंनी म्हटले होते.

Exit mobile version