Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पदवीधरमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला-अजित पवार

 

मुंबई प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाला पदवीधर मतदारसंघातील दारूण पराभव अतिशय जिव्हारी लागले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाजपला जोरदार टोले मारले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या टिकेला उत्तर देतांना जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीआधी पाच जागा जिंकण्याच्या वल्गना केल्या जात होत्या. प्रत्यक्षात मात्र याच्या उलटेच झाले. नंदुरबारमध्ये आमच्या कडचे अमरीश पटेल भाजपमध्ये गेल्याने एक जागा आली. ते इकडे आले की, आमचे होतील असा टोला त्यांनी मारला.

अजित पवार पुढे म्हणाले की, पदवीधर निवडणुकीतील पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला आहे. विशेष करून नागपुरातील पराभव हा अतिशय धक्कादायक असाच आहे. पुण्यात तर थेट चंद्रकांत पाटील यांच्यकडे धुरा असूनही पराभव झाला. आमचे उमेदवार हे प्रचंड मतांनी निवडून आले. अमरावतीत थोडी चूक झाली असली तरी भाजपचा उमेदवार निवडून आला नसल्याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले

Exit mobile version