Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही – राहुल गांधी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अनेकदा सरकारला कोरोना संदर्भात सतर्क केलं मात्र सरकारने आमची चेष्टा केली. मोदींनी कोरोनाला हरवलं असल्याचं म्हटलं. अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही, अशी टीका आज पुन्हा राहुल गांधी यांनी केली

 

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला.

 

कोरोना केवळ एक आजार नाही, हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागील वर्षी फेब्रुवारीत म्हटलं होतं, जागा बंद करा.

कोरोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा.” असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

 

Exit mobile version