Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निराशाजनक अर्थसंकल्प-राहुल गांधी

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे अशी टीकायुक्त प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे.

आज निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सरळसोट नाही तर गुंतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं वाटलं होतं. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सीतारामन यांनी सादर केलेलं भाषण हे बजेटच्या इतिहासातील प्रदीर्घ भाषण होतं. मात्र ते अत्यंत पोकळ आश्‍वासनाचं भाषण होतं अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. या अर्थसंकल्पात ठोस म्हणावी अशी कोणतीही तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सरकारची मानसिकता काय आहे? ते दाखवणाराच हा अर्थसंकल्प आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version