Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध ; हवाईदल प्रमुख भदोरिया

हैद्राबाद, वृत्तसेवा । देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु, गलवान खोऱ्यातील जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी दिली. हैदराबादजवळील वायुदलाच्या अकादमित ग्रॅज्युएशन परेड पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या जवानांनी देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली वचनबद्धता दर्शवली असल्याचंही आरकेएस भदोरिया यावेळी म्हणाले. सध्या शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहे. आम्ही भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत आणि तैनातही आहोत. आम्ही आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आपल्या क्षेत्रातील सुरक्षेची परिस्थिती असं सूचित करते की आमचं संरक्षण दल कायम कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतात आणि ते प्रत्येक गोष्टीवर लक्षही ठेवतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version