Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी वाटते

मुंबई:वृत्तसंस्था । बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांनी ‘अयोध्येनंतर आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचे दिसते. त्यामुळे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे’, अशी चिंता व्यक्त केली आहे.

बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार घडला तेव्हा केंद्रात नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्या सरकारमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते तर माधव गोडबोले तेव्हा केंद्रीय गृह सचिव होते. गोडबोले यांनी सखोल अभ्यास केला होता व पंतप्रधान नरसिंह राव यांना सल्लाही दिला होता. उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार वास्तूला धक्का लागू देणार नाही, असं सांगत असलं तरी त्यावर विश्वास ठेवू नये, असे गोडबोले यांचे मत होते. मात्र उत्तर प्रदेश सरकारवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधानांनी घेतली आणि दुर्दैवाने गोडबोले यांनी जी भीती व्यक्त केली होती तेच घडले, असे सांगत पवार यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत.

 

बाबरी मशीद निकालानंतर माधव गोडबोले यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा संदर्भ घेत पवार यांनी आपले म्हणणे मांडले. ‘बाबरी मशीद विध्वंस प्रकरणीच्या निकालाबाबत मी न्यायमूर्तींबद्दल काही बोलणार नाही’, असे पवार यांनी सुरुवातीला स्पष्ट केले ‘बाबरी निकालानंतर माधव गोडबोले यांचे विधान मी टीव्हीवर ऐकले. ‘सगळ्या प्रकारचे पुरावे याठिकाणी दिल्यानंतरही असा निर्णय होतो, याचं मला आश्चर्य वाटतं,’ हे उद्गार माधव गोडबोले यांचे होते. . त्यामुळे या प्रश्नाबाबत मनातली अस्वस्थता माध्यमांकडे नमूद केली त्याबद्दल मला आश्चर्य वाटलेलं नाही’, असे पवार म्हणाले.

 

शरद पवार यांनी अयोध्येत ज्या प्रमाणे मशीद पाडण्यात आली तसाच प्रकार काशी, मुथरेतही घडू शकतो अशी भीती स्पष्ट शब्दांत व्यक्त केली व भविष्यातील धोक्यांचे संकेत दिले.

Exit mobile version