Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशमुख १०० कोटी वसुलीचा संदर्भ : मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचे समन्स

 

मुंबई : वृत्तसंस्था । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी रुपये दरमहा वसुलीचे लक्ष्य दिले असल्याच्या माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्या आरोपांच्या संदर्भाने तपासाचा भाग म्हणून मुंबईतील पाच बार मालकांना ईडीने समन्स बजावले आहेत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. आर्थिक गैरव्यवहारामुळे तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला असून, आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आलं आहे. अंधेरीतील एका बार मालकांकडून वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये दिले जात होते आणि ते परमबीर सिंगाना याची माहिती द्यायचे अशी माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. नंतर ईडीनेही तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वीच ईडीने गुन्हा नोंदवून अनिल देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आलं आहे.

ईडीने अंधेरीतील एका बार मालकाची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती वाझे थेट तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देत होते, अशीही माहिती आता समोर आली आहे. हे पाचही बार मालक त्रास दिला जाऊन नये म्हणून वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये देत होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. परमबीर सिंगांनी १०० कोटी वसुलीचं टार्गट दिल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी सुरू केली. सचिन वाझे, अनिल देशमुख यांच्यासोबत गैरव्यवहारात असलेल्यांची चौकशी सध्या ईडीकडून केली जात आहे.

Exit mobile version