देवळाली ते दानापुर दरम्यान धावणार किसान विशेष पार्सल गाड़ी

भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेलवे प्रशासनद्वारा शेतकरी लोकासाठी त्यांचा माल बुक करण्यासाठी देवलाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी दि. ७ ऑगस्टपासून समयसारणीनुसार चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या किसान विशेष पार्सल गाडीमध्ये फळे , भाजीपाला आणि इतर नाशवंत माल बुक करू शकता येणार आहे. हि गाडी हप्ता मधून १ दिवस चालवली जाणार आहे. हि गाडी नाशिक , मनमाड , जळगाव , भुसावळ , बुऱ्हाणपूर , खंडवा , इटारसी, जबलपूर , सतना , कटनी , माणिकपूर , चिवकी , वाराणसी , पंडित दिन दयाळ उपाध्याय नगर , आणि बक्सर या ठिकाणी थांबेल . पार्टी द्वारा अन्य कोणत्या मध्यवर्ती स्टेशनवर थांब्याची मागणी असल्यास अतिरिक्त थांबा दिला जाऊ शकतो असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Protected Content