Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्ली हिंसाचार : आज पुन्हा तीन मृतदेह आढळले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना आज पुन्हा तीन मृतदेह आढळून आले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जखमी आहेत. हे मृतदेह नाल्यांमध्ये आढळले आहेत.

 

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या अजूनही वाढतेच आहे. आज एक मृतदेह गोकलपुरी भागातील नाल्यात आढळला. तर दोन मृतदेह त्याच परिसरातील भागीरथी विहार नाल्यातून पोलिसांनी बाहेर काढले. या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. हिंसाचारग्रस्त भागात अजूनही पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. या बंदोबस्तात हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण दुपारी पोलिसांना आणखी तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version