Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित, पुन्हा झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका : प्रकाश आंबेडकर

पंढरपूर (वृत्तसंस्था) दिल्लीत झालेली दंगल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने घडवून आणली होती. ही दंगल पूर्वनियोजित होती. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते शनिवारी पंढरपूर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्यानंतर पत्रकारांसोबत बोलत होते.

 

यावेळी आंबेडकर म्हणाले, दंगलीमध्ये सैनिकांचे गणवेश परिधान करून इतर लोक घुसलेले असल्याचे पोलिस व राजकीय नेते सांगतात. एका रिपोर्टनुसार २५ लाख सैनिकी गणवेश कोणीतरी विकत घेतले आहेत. याची माहिती सरकारने काढणे गरजेचे आहे. या सर्व घटनेवरून पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटणार नाही. तसेच राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात गेली की कारभार व्यवस्थित चालू शकत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जे घडले तेच आता मोदींच्या काळात घडत असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Exit mobile version