Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीच्या निकालाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नात्याने माझी : मनोज तिवारी

manoj tiwari

 

दिल्ली (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर जो काही निकाल येईल, प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्याची जबाबदारी आपल्यावर असेल, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिली आहे.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या खांद्यावर होती. यामुळे भाजपाचा दारुण पराभव झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मनोज तिवारी यांनी जो काही निकाल येईल, प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असे उत्तर दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा मनोज तिवारी यांनी आत्मविश्वास व्यक्त करत भाजपानं ५५ जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही असे म्हटले होते.

Exit mobile version