Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना कारने उडवले !

गोंदिया (वृत्तसंस्था) दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने उडवल्याची घटना आज सकाळी बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ घडली. यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

दहावीची आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. तीन विद्यार्थिनी परीक्षेसाठी केंद्रावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळून जात होत्या. यावेळी एका भरधाव कारने अचानक या तीन विद्यार्थिनींना उडवले. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघी जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी काही वेळ रास्ता रोको केला होता.

Exit mobile version