Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही ; लष्कराचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झाला नाही असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्तही खोटं असल्याचं भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितलं आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. या वृत्ताला काहीही अर्थ नाही हे वृत्त खोटं आहे असं परमजित सिंग यांनी म्हटलं आहे.

 

काही प्रसारमाध्यमांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं आणि पिन पॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर पिनपॉइंट स्ट्राइक करण्यात येतो आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जातो आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचं म्हणण्यात आलं होतं मात्र असं काहीही घडलं नसल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

Exit mobile version