मुंबई (वृत्तसंस्था) इंधन दरवाढीवरून ९ वर्षापूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारने केलेल्या ट्वीटवरुन तू गाड्या वापरणे बंद केलेस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? असा उपरोधिक सवाल गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी अक्षयकुमारला विचारला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून अक्षय़ कुमार याने १६ मे २०११ रोजी एक ट्विट केले होते. मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती, असे ट्विट अक्षय कुमार याने केले होते. यावरू आता आव्हाड यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. तू ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेस का? तू गाड्या वापरणे बंद केलेय का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी, पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी ट्विटसोबत अक्षय कुमारलाही टॅग केले आहे. दरम्यान, इंधनाच्या किमतीत सलग १९ व्या दिवशी दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा आजही भडका उडाला आहे.