Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा, देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बंद करा तुमचा सोशल मीडियावरील खेळ. देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या. भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करतोय, सध्या देशापुढे कोरोना व्हायरसचे सर्वात मोठे संकट आहे, त्यावर उपाय करण्याचे बघा, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटवरून टीका केली आहे.

 

 

सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ माजली होती. मात्र, मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला आहे. मोदींच्या या ट्विटनंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. राहुल यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून करोनाच्या बाबतीत जनजागृती करणारा जारी करण्यात आलेला व्हिडीओही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 

Exit mobile version