Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चार जवान जखमी

श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. या चकमकीत चार जवान देखील जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे.

पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणं सोपं जाव यासाठी, एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कारचे चार जवान जखमी झाले.

यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याचबरोबर घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला. दहशतवाद्यांचे मृतदेह एलओसीवर पाकिस्तानच्या दिशेने पडलेले आहेत व ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. २०२१ मध्ये पाकिस्तानकडून केलं गेलेलं हे पहिलं मोठं शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे.

Exit mobile version