Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर श्रध्दा जीवंत असती ! वडिलांचा पोलिसांवर आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रध्दा वालकर प्रकरणात पोलिसांनी सहकार्य केले असते तर ती जीवंत असती असा सांगत तिच्या वडिलांनी आज पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.

श्रध्दा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, २३ सप्टेंबर २०२२ ला मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. मी तिच्या मित्राकडूनच श्रद्धाची माहिती घेत होतो. मला माहित नव्हतं की श्रद्धा सोबत या दरम्यान काय होत होतं. २६ सप्टेंबर २०२१ ला माझं आफताबशी एकदाच बोलणं झालं, तेंव्हा माझी मुलगी कुठे आहे? कशी आहे हे विचारलं? त्यावर मला त्याने योग्य उत्तरं दिली नाही. तुलिंज पोलिसांनी मला तक्रार झाल्यावर कुठलीच माहिती दिली नाही. पोलिसांनी याकडे गांभिर्याने पाहिले नाही. अन्यथा श्रध्दा जिवंत असती असे ते म्हणाले.

दरम्यान, विकास वालकर यांनी डेटींग ऍपबाबत निर्बंध यावेत अशी मागणी देखील केली. तसेच धर्मजागृती होणे देखील गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आता क्रूरक्रर्मा आफताब याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version