Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा, सरकारला कोणताही धोका नाही : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार पाच वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात काही शंका नाही. विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. या सरकारला कोणताही धोका नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

यावेळी संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे चालणार. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. शरद पवारांच्या पाठिंब्याने हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सगळे पूल भक्कम आहेत. अजित पवार हे सरकारचा आधार आहेत. ते शरद पवारांच्या वक्तव्यामुळे नाराज नाहीत. शरद पवार यांनी त्यांच्या नातवाबाबत केलेले वक्तव्य ही त्यांची व्यक्तीगत बाब आहे. मी यावर अधिक काय बोलणार, असेही राऊत म्हणाले.

Exit mobile version