Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाळ्या वाजवून देशातील नागरिकांना मदत मिळणार नाही ;राहील गांधजींची मोदींवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) करोनामुळे देशातील छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजदूर यांना फटका बसला आहे. टाळ्या वाजवून यांना मदत मिळणार नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.

 

देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यापासून रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी टाळ्या वाजवत कौतुक करण्याचे आवाहनही मोदींनी केले होते. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी करोनामुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजदूर यांना फटका बसला आहे. टाळ्या वाजवून यांना मदत मिळणार नसल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version