Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी फडणविसांच्या सुरांची चिंता करू नये !

मुंबई । सामना अग्रलेखात शिवसेनेने फडणवीस आणि भाजपाचा समाचार घेतला, त्यावरून आता शिवसेना-भाजपा यांच्यात वाद सुरू झाले आहेत. सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये असा पलटवार भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करून म्हटलंय की, सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये, आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहर्‍यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणार्‍या वादात भातखळकर यांनी शिवसेनेला टोला मारल्याचे यातून दिसून आले आहे.

Exit mobile version