Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे शिवसेनेतून गेले त्यांना पुन्हा प्रवेश मिळणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जे लोक भटकंतीला गेले आहेत त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश मिळणे नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. जे खोक्यात बंद झाले, त्यांना पुन्हा खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नसल्याचे सांगत शिवसेनेत माया, प्रेम आणि जिद्द आहे. इतर गोष्टी पैशाने विकत घेता येतात. मात्र आपुलकी, माया, जिद्द, हिंमत पैशाने विकत घेता येत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

ते म्हणाले, की माणूस एकदा जिद्दीने उभा राहिला तर त्याच्यावर कितीही मोठे संकट आले, तरीही तो डगमगत नाही आणि असे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच आजसुद्धा आपल्यासमोर जे खोकेवाले आहेत, ज्यांनी पक्ष आणि चिन्ह पळवले, तरीही त्यांना उठता बसता उद्धव ठाकरे दिसतात, कारण उद्धव ठाकरे एकटे नाहीत तर त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, असे सांगत ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी १३ जानेवारीला कल्याण लोकसभा मतदारसंघात येणार असल्याची घोषणा केली.

Exit mobile version