जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 7016 रुग्ण बरे होऊन घरी गेले !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी आतापर्यंत (29 जुलैपर्यंत) 49 हजार 457 कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 37 हजार 599 तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 10 हजार 591 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय इतर अहवालाची संख्या 637 असून अद्याप 706 अहवाल प्रलंबित असल्याची आहे. एकूण करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी 7809 तपासण्या या रॅपिड ॲटिजेंन टेस्टद्वारे करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या 49457 व्यक्तींपैंकी 10591 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा 21.41 इतका आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत 7016 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्क्यांपर्यंत गेले आहे. बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 7016 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जळगाव शहर 1828, जळगाव ग्रामीण 235, भुसावळ 589, अमळनेर 488, चोपडा 471, पाचोरा 226, भडगाव 348, धरणगाव 348, यावल 339, एरंडोल 347, जामनेर 322, रावेर 483, पारोळा 363, चाळीसगाव 171, मुक्ताईनगर 258, बोदवड 171, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 29 रुग्णांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात सध्या 3082 ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह असलेल्या 3082 कोरोना बाधित रुग्णांपैकी कोविड केअर सेंटरमध्ये 2003, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 360, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये 548 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव शहर 770, जळगाव ग्रामीण 226, भुसावळ 221, अमळनेर 160, चोपडा 227, पाचोरा 124, भडगाव 52, धरणगाव 109, यावल 76, एरंडोल 134, जामनेर 359, रावेर 154, पारोळा 85, चाळीसगाव 246, मुक्ताईनगर 65, बोदवड 62, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 10 हजार 591 बाधित रुग्ण

जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 591 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 2692, जळगाव ग्रामीण 492, भुसावळ 870, अमळनेर 689, चोपडा 725, पाचोरा 373, भडगाव 412, धरणगाव 481, यावल 449, एरंडोल 497, जामनेर 715, रावेर 683, पारोळा 455, चाळीसगाव 445, मुक्ताईनगर 333, बोदवड 239, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 41 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 1898 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1898 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 685, शहरी भागातील 601 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 612 ठिकाणांचा समावेश आहे.

प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व्हेक्षणास 3117 टिम कार्यरत, 8 लाख 4 हजार 656 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण पूर्ण

कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात 3117 टिम कार्यरत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1040, शहरी भागातील 1129 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 948 टिम घरोघरी जाऊन तसेच नागरीकांची तपासणी करीत आहेत. या टिमच्या माध्यमातून जिल्हाभरात आतापर्यंत 1 लाख 78 हजार 448 घरांचे तर 8 लाख 4 हजार 656 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 2 लाख 81 हजार 693 लोकसंख्या ग्रामीण भागातील तर उर्वरित लोकसंख्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका क्षेत्रातील आहे.

जिल्ह्याचा मृत्युदर 4.65 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश

जिल्ह्यात आतापर्यंत 493 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यापैकी 414 मृत्यु म्हणजेच 84 टक्के मृत्यु हे 50 वर्षावरील वयोगटातील आहेत. तर एकूण मृत्युपैकी 273 मृत्यु हे जुने आजार, विविध व्याधी असल्याने झाले आहे. बाधित रुग्णांपैकी विचार केला असता जिल्ह्याचा मृत्युदर हा 4.65 टक्के इतका असून तो अजून कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या संशयित रुग्ण शोध मोहिम सुरु असल्याने नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Protected Content