जन्मभूमी हीच कर्मभूमी मानून आरोग्य  सेवा द्या – डॉ.उल्हास पाटील  यांचा कानमंत्र

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आपल्यावर निस्वार्थी प्रेम फक्‍त आई-वडीलच करु शकतात, त्यांच्या प्रेमाचा नेहमी आदर करा, दर महिन्यातून एकदा तरी त्यांची भेट घ्या, त्यांच्याजवळ राहा, जन्मदात्यांचे आशिर्वाद घ्या, दुसर्‍या मोठ्या शहरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्यापेक्षा जन्मभूमीतच वैद्यकीय सेवा द्या, तिथे जे स्पेशालिस्ट डॉॅक्टर्स नाहीत, त्याचे पुढे शिक्षण घ्या, हार्डवर्क करा आणि जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवतं यशस्वी व्हा असा कानमंत्र गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांनी दिला.

 

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात शुक्रवार, २७  रोजी विद्यापिठ नियमावलीनुसार आयोजित दिक्षांत सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची विशेष उपस्थीती होती, याप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर सदस्या डॉ. केतकी पाटील,  डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर  हे उपस्थीत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने दिक्षांत सोहळ्यास प्रारंभ झाला. कनव्होकेशन सुरु झाल्याचे जाहिर करताच भावी डॉक्टरांनी जल्‍लौष केला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासमवेत डॉक्टर्स उपस्थीत होते. डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपीस्ट महाविद्यालयातून तब्बल ४१ डॉक्टर्स आज पदवी संपादन करुन वैद्यकीय सेवेसाठी बाहेर पडले असल्याचा आनंद यावेळी व्यक्‍त करण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर्विकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांनी मनोगतात महाविद्यालय व प्रशासनाचे कौतुक करत आभार मानले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकीतेश श्रीपाद व आभार समृध्दी यांनी मानले. अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
पाल्यांची तुलना करु नका – डॉ.उल्हास पाटील
वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडे पाच वर्षे लागली, पुढे उच्च शिक्षणासाठी आणखी काही वर्षे जातील, मात्र त्याचवेळी त्यांच्यासोबतची अन्य मुले अभियांत्रिकी, वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त करुन चांगल्या नोकरी लागल्याचे आपल्याला दिसेल. त्यावेळी आपल्या पाल्याची तुलना करु नका, कारण वैद्यकीय सेवा ही व्यक्‍तीच्या शरिराशी संबधित आहे. त्याची तुलना होऊच शकत नाही, आणि ६० व्यावर्षी डॉक्टर्स रिटायर्ड होत नसतो तर त्याचा मान, अनुभव वाढत जातो आणि वयाच्या ८० व्यावर्षी डॉक्टरला विशेष सन्मानप्राप्त होत असतो. त्यामुळे पाल्यांची तुलना इतरांशी न करता त्यांना त्यांच्या आवडीचे उच्च शिक्षण घेऊ द्या, असे आवाहनही  डॉ.उल्हास पाटील  यांनी केले.

पखांना बळ दया -डॉ. केतकी पाटील
पाल्यांच्या पंखात पालकांनी बळ भरावे तरच तो उंच आकाशात भरारी घेवू शकेल पण मग याचा असा अर्थ होत नाही की पाल्य लाडावून ठेवावा. योग्य मार्गदर्शन व दिशा देण्यारे पालक पाल्याला यशाचा राजमार्ग उपलब्ध करून देतात. आपल्या पालकांची हे परिश्रम पाल्याने लक्षात घेतले पाहीजे कारण त्यांच्या यशात सिहांचा वाटा पालकांचा असतो. काही वर्षापुर्वी फिजीओथेरेपीस्ट ही संकल्पनाच लोकांना माहित नव्हती पण तुमचे सिनियर व तुम्ही जे यश प्राप्त करून समाजात सेवा देत आहे त्यामूळे या शाखेला देखिल महत्व प्राप्त झाल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी सांगितले.

Protected Content