Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा

यावल प्रतिनिधी | चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चितोडा येथील तालुक्यातील चितोडा येथील तीन बालकांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली आहे. वरुण इंगळे (वय १०), कृष्णा किरण पाटील (वय १३) व दुर्गेश चंदू पाटील (वय १२) या बालकांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. काही वेळानंतर त्यांना उलट्या झाल्या.

दरम्यान, या तिन्ही बालकांना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, परिचारिका आरती कोल्हे, ज्योत्स्ना निंबाळकर, संजय जेधे आदींनी उपचार केले. तर यातील वरुण इंगळे याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version