Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा पुणेरी टोमणा चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 

आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. त्याचसोबत मराठा आरक्षण, फडणवीस-पवार भेट अशा मुद्द्यांवर चर्चाही केली.

 

फडणवीस-पवार भेटीबद्दल पाटील म्हणाले, शरद पवारांची प्रकृती   काही दिवसांपासून ठीक नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया ताईंना विनंती केली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

 

Exit mobile version