Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा नदीत विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । गिरणा नदीत जाळे टाकून मासे धरताना मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला.

पुनगाव येथील रहिवासी लताबाई समाधान मालचे (वय २५) हिने मासे पकडण्यासाठी लताबाईने गिरणा नदी पात्रात जाळे टाकले होते. या दरम्यान त्यांचा वीज पंपाला स्पर्श झाला. यामुळे शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही दुर्घटना दुपारी तीनच्या आसपास घडली. यावेळी लताबाईचे पती समाधान मालचे हे शेतावर काम करण्यासाठी गेले होते. लताबाई यांच्या पश्‍चात पती, दोन मुले आहेत.

Exit mobile version