गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती

मुंबई : राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून लोक फिजीकल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत असल्याने ही स्थिती ओढवू शकते असा इशारा देण्यात आला आहे.

 

केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदवली, तसाच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव साजरा होत असून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. बहुतांश नागरिक सध्या मास्क वापरत नसल्याचे दिसून येत असून त्यामुळे कोरोना वेगाने फैलावण्याची भीती राज्याचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली.

 

गणेशोत्सवाच्या काळात जर कोरोना संकेतांचे नीट पालन केले, तर मात्र कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्यापासून रोखली जाऊ शकते, असे डॉ. आवटे यांचा म्हणणे आहे. गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशनची काळजी घेणे, मास्कशिवाय प्रवेश न देणे ही खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य अधिका-यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची केंद्रे वाढवणे आणि त्याचबरोबर टेस्ट आणि औषध पुरवठा यांची सोय करणे गरजेचे असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Protected Content