Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुशखबर राज्यात लवकरच २०६२ जागांवर शिक्षक भरती

मुंबई प्रतिनिधी   राज्यात लवकरच २०६२ जागांवर शिक्षक भरती होणार असल्याची महत्वाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

 

राज्याच्या शिक्षण विभागात एकूण २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या एकूण अर्जांमधून ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षक भरतीच्या प्रक्रियेबाबतचं एक ट्विट गायकवाड यांनी केलं आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खासगी व्यवस्थापनाच्या २०६१ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिली आहे. यामुळे आता राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version