Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुलेआम मन की बात सांगा, लोकांना तुमचा कुटील डाव कळू द्या ; कॉंग्रेसचा भाजपला टोला

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही नारायण राणे यांची वैयक्तिक मागणी आहे. ती भाजपची अधिकृत मागणी नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. आता तिच मागणी राणे यांनी भाजच्या मुख्यालयातूनच केली आहे, असं सांगतानाच भाजप राणेंचा खांदा का वापरत आहे. खुलेआम मन की बात सांगा. लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे, असे आव्हानच काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला केले आहे.

 

 

भाजप नेते नारायण राणे यांनी थेट भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. नारायण राणे यांनी काल भाजपच्या मुख्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करत सुटले आहेत. मागचापुढचा कोणताही विचार केला जात नाही. कोरोना रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही राणेंनी केली होती. त्यावर सावंत यांनी ट्वीट करत भाजप राणेंचा खांदा का वापरत आहे. खुलेआम मन की बात सांगा. लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे, असे म्हटले आहे.

Exit mobile version