Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोण येणार, कोण जाणार या चर्चेत मी नाही, सध्या कोरोनावर लक्ष द्यायचेय : जितेंद्र आव्हाड

मुंबई (वृत्तसंस्था) कोण येणार, कोण जाणार या चर्चेत मी नाही. मला सध्या कोरोना या विषयावर लक्ष द्यायचे आहे. , अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

 

भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक असल्याचे भाष्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कोण येणार, कोण जाणार या चर्चेत मी नाही. मला सध्या कोरोना या विषयावर लक्ष द्यायचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल याकडे लक्ष देणं महत्वाचे आहे. या कठीण परिस्थिती घाणेरडं राजकारण करणे योग्य नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Exit mobile version