Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्राने महाराष्ट्राला दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर द्यावेत : नवाब मलिक

 

मुंबई, वृत्तसंस्था ।  केंद्र सरकारने रेमडेसिविर राज्यांना वाटप करतांना महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार  रेमडेसिवीर  देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी जाहीर केली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत राज्याला दिवसाला ५० हजार  रेमडेसिवीर  दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यात मोठं संकट निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की,  केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना होणाऱ्या  रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार आधीपासून मागणी करत असल्याप्रमाणे दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. आतापर्यंत आम्हाला दिवसाला ३६ हजार  रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यात मोठं संकट निर्माण होऊ शकतं, अशी भीती देखील नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version