किरकोळ कारणावरून मायलेकाला मारहाण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील रांजणी गावात घरगुती वादातून निर्माण झालेल्या संशयातून तीन जणांनी दोन जणांना अश्लिल शिवीगाळ करून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी तीन जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील रांजणी गावात स्वप्नील सुपडू साखरे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ मार्च रोजी रात्री आठ वाजता स्वप्नील व त्याची पत्नीचे कौटुंबिक वादातून भांडण सुरू होते. यात शेजारी राहणारे प्रशांत सुपडू साखरे यांनी आपल्याला शिवीगाळ करत असल्याच्या संशय घेतला. त्यावरून प्रशांत साखरे, मेघा प्रशांत साखरे आणि दिपक उर्फ लकी रमेश भटकर रा. आकोला यानी अश्लिल शिवीगाळ करून फावड्याच्या दांडने  मारहाण केली. तर स्वप्नीलची आई मालूबाई सुपडू साखरे यांना देखील काठीने डोक्याला मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर स्वप्नील साखरे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रीयाज शेख करीत आहे.

Protected Content