किरकोळ कारणावरून महिलेसह मुलांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी राहणाऱ्या महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना किरकोळ कारणावरून सहा जणांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंजनाबाई नारायण पाटील रा. स्वामी समर्थ चौक, रामेश्वर कॉलनी ह्या महिला आपल्या दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मंगळवार २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या जवळ सुरज कुमावत (पुर्ण नाव माहित नाही) याचे अंडी बिर्याणी दुकान आहे. त्या दुकानावर हिरव्या रंगाचे नेट लावलेले होते. अज्ञात व्यक्तीने नेट फाडून नुकसान केले होते. हिरवा नेट हा अंजनाबाई यांचे मुले यशवंत पाटील आणि हेमंत पाटील यांनी फाडून नुकसान केले या संशयावरून सुरज कुमावत, मनोज निंबाळकर, आबा केने, धीरज केने, केतन सोनवणे आणि निलेश निंबाळकर (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही)रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांनी अंजनाबाई पाटील व त्यांची मुले यशवंत पाटील आणि हेमंत पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंजनाबाई पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरज कुमावत, मनोज निंबाळकर, आबा केने, धीरज केने, केतन सोनवणे आणि निलेश निंबाळकर (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही)रा. रामेश्वर कॉलनी, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फैाजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

Protected Content