Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण; ९ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शेतात सोबत कामाला येत नाही म्हणून २५ वर्षीय तरूणाला नऊ जणांनी बेदम मारहाण केली तर एकाने कानाजवळ सुरी मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील तिघ्रे येथे घडली. नशिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तिघ्रे येथील रहिवाशी सुनिल रामसिंग बेलदार (वय-२५) हा आपल्या कुटुंबियासह राहतो. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. गावातील दिलीप रोहिदास जाधव, राजेश रोहिदास जाधव, अशोक रोहिदास जाधव, मनोज रोहिदास जाधव, सोमनाथ मानसिंग बेलदार, विजय जगन बेलदार, किसन भुरा जाधव, सुरेश जगन बेलदार आणि सुनील जगन बेलदार सर्व रा. तिघ्रे ता. जि.जळगाव यांनी सोबत कामावर चल असे सांगितल्याने सुनील रामसिंग बेलदार यांनी नकार दिला. याचा राग आल्याने सर्वांनी शिवीगाळ करून सुनील बेलदार याला बेदम मारहाण केली तर सहकारी प्रकाश रामलाल बेलदार यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या कानावर सुरा मारून दुखापत केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुनील रामसिंग बेलदार यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहे.

Exit mobile version