Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटात ट्रक कोसळून दोन जण जागीच ठार!

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | टाईल्सने भरलेला ट्रक औरंगाबादकडे जात असताना कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, टाईल्सने भरलेला ट्रक (क्र. एम.एच.१८ एए ७४२३) चाळीसगावहून औरंगाबादकडे जात असताना अचानक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळून फय्याज दरबार शेख (२४) रा. शेगाव जिल्हा. औरंगाबाद व आसाराम आंबादास दाभाडे (२९) रा. मुरूमखेडा जिल्हा औरंगाबाद या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:१६ वाजताच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शेख अनिल शेख गफ्फार रा. मुरूमखेडा जिल्हा. औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३०४(ए), २७९, ४२७, १८४ व १३४(बी) अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहेत.

Exit mobile version