Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते ; फडणवीसांचा राऊतांना टोला

नाशिक (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

सामना’ किती जण वाचतात? माध्यमांना आयती बातमी मिळते, म्हणून ‘सामना’ला तुम्ही प्रसिद्धी देता. ‘सामना’मध्ये कोरोनाबाबत एकही अग्रलेख नाही.’ असे फडणवीस म्हणाले. नाशिक दौऱ्यात ते ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात मास टेस्टिंग महत्वाचे आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी नंबर गेम खेळण्यात व्यस्त आहे. आकडे कमी दाखवण्यासाठी मुंबईकरांना सरकार अडचणीत आणत आहे, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला. एवढेच नव्हे तर ‘सामना’ हे शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा प्रश्न देखील फडणवीसांनी विचारला आहे.

Exit mobile version