Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उलट भाजपाचेच आमदार राष्ट्रवादीत यायला इच्छूक ; नवाब मालिकांचा गौप्यस्फोट

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही अफवा विरोधक पसरवत असून ही चर्चा खोटी आणि बिनबुडाची आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

 

 

काही जण राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयारी करत असल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरु आहे.

Exit mobile version