Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा

food poision

food poision

लातूर (वृत्तसंस्था) औसा तालुक्यात याकतपूर गावात महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी आणलेली भगर खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा झाली आहे.

औसा तालुक्यात याकतपूर या गावातील अनेक जणांनी उपवास असल्याने जवळच्या किराणा दुकानातून भगर विकत घेतली. ती खाल्ल्यानंतर अनेकांना डोके दुखी, उलटी, मळमळ, जुलाब असे त्रास होऊ लागला. यानंतर या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्यानंतर सर्वाना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला.

Exit mobile version