Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचे पालघरप्रमाणे राजकारण करू नका : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचे पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, अशी भाजपवर अप्रत्यक्ष टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

 

 

बुलंदशहरमध्ये दोन साधूंची रात्री हत्या करण्यात आली. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाष्य केले आहे. ‘अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी अदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,’ असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, पालघरमध्ये चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

 

Exit mobile version