Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमच्या आमदारांना भाजपकडून पैशाचे आमिष दाखवले जातेय ; कॉंग्रेसची एसीबीकडे तक्रार

congress bjp 647 033117014707 0 20180481176 1


जयपूर (वृत्तसंस्था)
सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना भाजपकडून पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसकडून या पार्श्वभूमीवर थेट एसीबीकडे तक्रार करण्यात आली आहे.

 

काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना जाळ्यात ओढण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले जात आहे. हे प्रयत्न लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहेत. तसेच हा एक गुन्हादेखील आहे. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस चांगलीच सावध झाली असून काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये हलवण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version